नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि विद्यमान केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद हे यावेळी प्रथमच लोकसभेवर निवडून आले आहेत. त्यांनी कॉंग्रेस उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांचा तब्बल 2 लाख 84 हजार मतांनी पराभव केला. प्रसाद यांना 6 लाख 7 हजार मते मिळाली तर शत्रुघ्न सिन्हा यांना 3 लाख 22 हजार मते मिळाली. 65 वर्षीय प्रसाद हे आत्तापर्यंत कधीच लोकसभेला निवडून आले नाहीत. त्यांना चार वेळा राज्यसभेचे सदस्यत्व मिळाले आहे. त्याच आधारावर त्यांनी आत्तापर्यंत केंद्रात अनेक मंत्रालयाचे काम पाहिले आहे. सन 2000 साली त्यांना राज्यसभा सदस्य म्हणून प्रथम संधी मिळाली होती. तेव्हापासून ते संसदीय राजकारणात आहेत. त्यांनी सन 1954 मध्ये बिहार मध्ये विद्यार्थी चळवळीतून सामाजिक क्षेत्रात काम सुरू केले होते. ते स्वता सर्वोच्च न्यायालयातील वकिलही आहेत.