नवी दिल्ली – एका माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार कॅन्सल तिकिटावर रेल्वेला कोट्यवधींचा नफा होत आहे. मध्य प्रदेशचे एक आरटीआयचे कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी रेल्वे मंत्रालयाकडे माहिती अधिकारी माहिती मागवली की, कॅन्सल तिकिटांच्या माध्यमातून रेल्वेला किती पैसे मिळाले.
यावर मिळालेल्या उत्तरानुसार रेल्वेला कॅन्सल तिकिटातून 1 हजार 518 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. हा नफा आरक्षित तिकीट कॅन्सल केल्यानंतर झाला आहे. तर अनारक्षित तिकीट कॅन्सल झाल्यामुळे रेल्वेला 18 कोटी 23 लाख रुपयांचा नफा प्राप्त झाला आहे. तिकीट रद्द केल्यामुळे जे शुल्क आकारले जाते ते भविष्यात कमी होण्याची शक्यता कमी आहे.