वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज लोकसभा निवडणुकांनंतरच्या आपल्या भूमिकेबाबत वक्तव्य केलं आहे. माध्यमांशी संवाद साधत असताना प्रकाश आंबेकर यांनी आपली भूमिका मांडली असून ते म्हणाले, “भाजपला बहुमत न मिळाल्यास नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत. अशावेळी तिसरी आघाडी सत्तेत यावी यासाठी आम्ही प्रयत्न करु. राहुल गांधी की मायावती, असा मुद्दा उपस्थित झाल्यास आमचा पाठिंबा कायम मायावतींना असेल. मात्र जर शरद पवारांचे नाव पंतप्रधान पदासाठी चर्चेत आले तर त्यांना आमचा प्रखर विरोध असेल, हे स्पष्ट आहे,”
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी, “वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याने विधानसभेला काँग्रेससोबत आघाडीचा अजिबात विचार होणार नाही.” अशी स्पष्ट भूमिका मांडली.