बिहार – राफेल व्यवहार प्रकरणाबाबत पुन्हा एकदा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारच्या सुपौल येथील जनसभेत राहुल गांधी म्हटले की, ‘संपूर्ण देशात बिहार युवा वर्ग बँक आणि खासगी कार्यालयात चौकीदारी करतात. ते चौकीदार प्रामाणिक असतात. जर बिहारमधील कोणी एखाद्या बँकेपुढे चौकीदारी करत असेल तर त्या बँकेत कधीच चोरी होणार नाही मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधील चौकीदारांना बदनाम केले आहे. जेव्हा राफेल व्यवहार प्रकरणाबाबत तपास होईल. तेव्हा मोदी आणि अनिल अंबानी या दोन्ही चौकीदारांना शिक्षा होईल.
R Gandhi in Bihar: Magar ye jo vyakti (PM) hai, desh ka chowkidar kehta hai magar asal mein Anil Ambani ka chowkidar hai. Bihar ke yuva poore desh mein desh ki raksha karte hain, imandari se, dhoop, aandhi,toofan mein, aadhi roti kha kar, un sab ko ek chowkidar ne badnam kiya hai
— ANI (@ANI) April 20, 2019