नवी दिल्ली: राफेल प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानंतर, अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती. आता ‘कोर्टानेही सांगितलं चौकीदार चोर है’, असे म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधानांवर निशाणा साधला होता.
दरम्यान, या वक्तव्यामुळे राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टात दिलगिरी व्यक्त केली. कारण या वक्तव्यामध्ये राहुल गांधींनी ‘कोर्टानेही सांगितलं चौकीदार चोर है‘, असा उल्लेख केला होता. त्यानंतर कोर्टाने राहुल गांधींना खुलासा मागितला होता. मात्र भाजपचे लोक राफेल प्रकरणात राहुल गांधी यांनी सर्रास माफी मागितल्याचा खोटा कांगावा करीत आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे.
राफेल प्रकरणात कॉंग्रेस अध्यक्षांना सुप्रिम कोर्टात माफीनामा सादर केला आहे, असे भाजपच्या प्रवक्त्याने पत्रकार परिषदेत नमूद केले आहे. त्यावर प्रतिक्रीया देताना कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला म्हणाले, भाजपच्या खोटारडेपणाला कोणत्याही सीमा राहिलेल्या नाहीत. त्यांच्या बदनामीच्या मोहीमेलाही कोणतीही मर्यादा राहिलेली नाही. त्यांनी राहुल गांधी यांनी कोर्टात दिलेल्या उत्तराचा विपर्यास करून कांगावा चालवला आहे.
खोटी नारेबाजी करणाऱ्यांचे पितळ उघडे पडले#लाज_कोणाला_वाटावी?#CongAdmitsJhoot #RahulApologizes@INCIndia @INCMaharashtra @RahulGandhi pic.twitter.com/T6If46YNzL
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 22, 2019
23 मई को जनता की अदालत में फैसला होकर रहेगा कि कमलछाप चौकीदार ही चोर है।
न्याय होकर रहेगा।
गरीबों से लूटकर अमीर मित्रों को लाभ देने वाले चौकीदार को सज़ा मिलेगी। #ChowkidarChorHai
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 22, 2019