पुणे – पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे-वर पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. मात्र, पण, फक्त 700 पोलीस ही सांभाळत आहेत. मात्र, हे वास्तव असतानाही महामार्ग पोलिसांनी गेल्या काही वर्षांच्या कालावधीत या महामार्गावर चोख बंदोबस्त ठेवला आहे. विशेष म्हणजे, या महामार्गावरील अपघातांना आळा घालण्यास महामार्ग पोलिसांना अपेक्षेपेक्षाही अधिक यश आले आहे.
पुणे आणि मुंबई या महत्त्वाच्या शहरांमधील वाहतुकीचे अंतर कमी व्हावे आणि प्रवास सुखकर व्हावा, यासाठी या महामार्गाची उभारणी करण्यात आली. पण, त्यामुळे अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. परिणामी या महामार्गावर प्रवास करताना प्रवाशांमध्ये असुरक्षतेतेची भावना निर्माण झाली आहे. हे वास्तव असले तरीही या महामार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात महामार्ग पोलिसांना यश आले असून आगामी काळात हा बंदोबस्त आणखी वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती महामार्गाचे पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी “प्रभात’ शी बोलताना दिली.