पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयातून विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज करण्याकरिता 24 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. 3 ते 14 जून या कालावधीत नियमित शुल्काने व 15 ते 19 जूनदरम्यान विलंब शुल्काने अर्ज सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपली असून आता मुदतवाढ देण्यात आली आहे, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी दिली आहे.
कनिष्ठ महाविद्यालयांनी नियमित व विलंब शुल्कासह 24 ते 29 जूनदरम्यान बॅंकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचे आहे. शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या विभागीय मंडळाकडे 2 ऑगस्ट रोजी जमा कराव्या लागणार आहेत. विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नाही.