पुणे – शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिरूरमधून 3, तर मावळमधून 7 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता शिरूर लोकसभा मतदारसंघातून 23, तर मावळमधून 21 उमेदवार रिंगणात आहे.
शिरूरमधून 26 उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यातील 3 उमेदवारांनी माघार घेतली. तर मावळमधून 28 उमेदवारांनी अर्ज भरले होते. यातील सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि मावळमधून शिवसेनेतर्फे श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पार्थ पवार हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, या दोन्ही मतदारसंघांसाठी दि.29 एप्रिल रोजी मतदान होणार असून या दोन्हींसह पुणे आणि बारामतीची मतमोजणी दि. 23 मे रोजी होणार आहे.