उत्तरप्रदेश सरकारवर टीकास्त्र
नवी दिल्ली -कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना करण्यात आलेली अटक घटनाबाह्य आहे. अटकेसाठी कुठलीही कागदपत्रे उपलब्ध केली नाहीत, असा आरोप करत त्यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी उत्तरप्रदेश सरकारवर टीकास्त्र सोडले.
मृतांच्या कुटूंबीयांना भेटणे हा गुन्हा आहे का? सत्याची बाजू घेणारा प्रत्येक आवाज दाबण्याचा प्रयत्न ते सरकार करत आहे का? प्रियांका यांना अटक करताना कायद्याचा गैरवापर केला गेला. उत्तरप्रदेश सरकारने प्रियांका यांची तातडीने सुटका करावी. लोकशाहीचे रूपांतर हुकूमशाहीत करू नये, अशी प्रतिक्रिया वढेरा यांनी ट्विटरवरून दिली.