रायगड – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे राज्यात सभा घेत आहेत. राज ठाकरे यांनी यापूर्वी नांदेड, सोलापूर, कोल्हापूर,सातारा आणि पुणे येथील सभेतून नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर टीका केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आगामी लोकसभा निवडणूक लढवनार नसली, तरी भाजप विरोधात त्यांनी जोरदार टीका केली आहे.
सोलापूर येथील सभेत राज ठाकरे यांनी हरिसाल या डिजिटल गावाच्या जाहिराती संदर्भात पोलखोल केली होती, त्यानंतर आजच्या रायगड येथील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी, मोदींनी खासदार म्हणून जे नागापूर गाव दत्तक घेतले होते, त्याची पोलखोल व्हिडिओ च्या माध्यमातून केली. या गावात कोणतीच सुधारणा झाली नसल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी पुन्हा सिद्ध केले. यावरून टीका करताना राज ठाकरे यांनी गावात एकही सुविधा आली नसल्याचे सांगत, साधे नाले साफ नाही होऊ शकले ना महाविद्यालय ना दवाखाना, मग देशाचे काय भले करणार, असा प्रश्न देखील उपस्थित केला.
पुढे राज ठाकरे यांनी भाजप सरकारच्या डिजिटल योजनेची पोलखोल केल्यानंतर आता अजून एक भाजपच्या योजनेची पोलखोल त्यांनी यावेळी केली. मोदी सरकारने पहिले कॅशलेस गाव म्हणून ज्या ‘धसई’ गावाचा गाजावाजा केला होता, त्या गावात १ टक्का सुद्धा कॅशलेस नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. देशातील पहिलं कॅशलेस गाव ‘धसई’ची भाजपने मोठ्या प्रमाणात जाहिरात केली होती. मात्र धसई गावातील नागरिकांना कॅशलेस व्यवहार म्हणजे काय? हेच माहित नाही. तसेच गावात बँक, एटीएम नसून व्यवहार पूर्णपणे ‘कॅश’व्दारेचं होत असल्याचे, रायगड येथील सभेत ठाकरे पुन्हा व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा सर्वांसमक्ष सिद्ध केले.
‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल