सोलापूर – पंढरपूरच्या वारीमध्ये पहिल्यांदाच 1.5 मिलियन विठ्ठल भक्तांनी सकारात्मक परिवर्तनाची बीजे रोवली. टाटा सॉल्टने वारकऱ्यांना भूमातेच्या सेवेची संधी दिली. पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना या वारकऱ्यांनी रोपे लागवड करून हरित प्रगतिशील भविष्यासाठी योगदान दिले. दरवर्षी महाराष्ट्रात 0.02 अंश सेल्सियस इतकी तापमानात वाढ नोंदवली जात आहे.
महाराष्ट्र सरकारच्या जंगलांविषयीच्या आकडेवारीनुसार पुणे, सातारा व सोलापूर परिसरात जंगलांचा ऱ्हास होत आहे. पंढरपूर वारीचा हाच मार्ग असतो आणि म्हणूनच टाटाने माऊलीची “सावली’ हा आपला उपक्रम वारीच्या माध्यमातून राबविण्याचे ठरवले. पंढरपूर वारीच्या मार्गात 250 किमीच्या पट्ट्यामध्ये 10,000 झाडांची लागवड करून टाटा सॉल्टने या समस्येच्या निवारणासाठी पुढचे पाऊल उचलले आहे. यामुळे भविष्यात पंढरपूर वारीचा मार्ग हिरवागार दिसू लागेल.
उन्हातान्हाची पर्वा न करता 700 वर्षे जुनी वारीची परंपरा जिवंत ठेवणाऱ्या वारकऱ्यांसाठी ही हिरवाई खूप मोठा दिलासा ठरेल. वारकऱ्यांचे हे योगदान हरित व प्रगतिशील महाराष्ट्रासाठी खूप मोलाचे असणार आहे.