पिंपरी – पवना व इंद्रायणी नदीपात्रात हजारो मासे मेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत उच्च्यस्तरीय चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, अवघ्या 15 दिवसांवर पालखी सोहळा आला असून इंद्रायणी नदीची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रविवारी (दि.9) अचानक देहू येथील इंद्रायणी नदीपात्रात हजारो मासे मृत आढळले आहे. गेल्या तीन दशकातील ही मोठी घटना असून सरकारच्या निष्क्रियतेमुळेच मासे मृत पावले आहे. नदी पात्रात जलपर्णी वाढत असून त्यावर कुठलीही उपाययोजना केली जात नाही. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सांडपाणी प्रक्रिया (एसटीपी) प्रकल्प गेल्या दोन वर्षापासून तयार झाला आहे. मलनि:सारण वाहिन्याही टाकल्या आहेत. मात्र, हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला असता. तर या माशांचा जीव वाचला असता. नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याला थांबवून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.