चिंचवड – शहरात महापालिकेने पाणी कपात जाहीर केली आहे. परंतु, त्या आधीपासूनच अनेक सोसायट्यांना खासगी टॅंकरद्वारे पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे सोसायट्यांची पाणी बिले माफ करावीत, अशी मागणी महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे.
महापालिकेतील सत्ताधारी भाजप व प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळेच पाणी कपात ओढवली आहे पालिकेत याआधी राष्ट्रवादीची सत्ता असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रत्येक बाबतीत लक्ष देत मात्र भाजपची सत्ता आल्यापासून जनतेला कोणीच वाली राहिला नाही. भाजपचा पालिका प्रशासनावर अजिबात वचक नाही, असा आरोप तापकीर यांनी केला आहे.