नवी दिल्ली – कॉफी विथ करण या कार्यक्रमात हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यानंतर त्यांच्यावर समाजाच्या सर्व स्तरातून टिका केली होती. हार्दिक पांड्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर माफी देखिल मागितली होती. मात्र, त्यांच्या या उत्तरावर समाधानी न झाल्यामुळे बीसीसीआयने दोघांवर प्रत्येकी २०-२० लाख रुपये इतका दंड सुनावला आहे. त्यातील दहा लाख रुपये हे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटूंबियांना दिले जाणार आहे. तर, आणखी दहा लाख रुपये ब्लाइंड क्रिकेटला फंडिंग स्वरूपात दिले जाणार आहे. मात्र, या दोन्ही खेळाडूंनी चार आठवड्यांच्या आत दंडाची रक्कम जमा केली नाही तर बीसीसीआय त्यांच्या मॅच फीमधून ही रक्क्म कापून घेणार आहे.
BCCI Ombudsman-If the amounts are not deposited by KL Rahul & Hardik Pandya within the time granted, BCCI may deduct the amounts from the match fees payable to them. https://t.co/WbELxROP4K
— ANI (@ANI) April 20, 2019