मुंबई – राज्याच्या अनेक भागात गंभीर दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून याविषयी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या स्थितीविषयी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. पवार यांनी सोमवारी बीड जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पहाणी केली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की राजकीय मतभेद बाजुला ठेऊन आपला पक्ष दुष्काळ ग्रस्तांना मदत करील.
मुख्यमंत्र्यांबरोबर आपण राज्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेऊ. असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. राज्याच्या अनेक भागात अन्न आणि पाण्याची टंचाई निर्माण झाल्याची माहितीहीं त्यांनी यात दिली आहे. पवार यांनी बीड जिल्ह्यातील अष्टी तालुक्यातल्या खडकत गावात जाऊन तेथील ग्रामस्थांशी त्यांच्या समस्यांच्या बाबतीच चर्चा केली.