नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अक्षरश: पानिपत झाले आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेने केवळ ५२ जागांवर समाधान मानावे लागणाऱ्या काँग्रेसची कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला राजीनामा सादर केला. मात्र हा राजीनाम्याचा प्रस्ताव एकमतानं फेटाळला असल्याचे काँग्रेसने सांगितले आहे.
Randeep Surjewala, Congress: Party President Rahul Gandhi offered his resignation but it was rejected by the members of CWC unanimously. pic.twitter.com/aXLjPa72aj
— ANI (@ANI) May 25, 2019
काँग्रेसची कार्यकारिणी समितीची बैठक पार पडल्यानंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा राजीनामा फेटाळला असल्याची माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेत पत्रकारांना रणदीप सिंग सुरजेवाला आणि के. सी. वेणुगोपाल यांनी संबोधित केलं. तसेच पक्षाला राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची गरज असल्याचे देखील यावेळी सांगितले.
तसेच लोकसभेतील पराभव हा विनम्रतेनं मान्य केला असून प्रत्येक पातळीवर आत्मपरिक्षण करणार असल्याचे काँग्रेसने यावेळी सांगितले सांगितले. तसेच लवकरच काँग्रेसच्या कार्यकारणीत मोठे बदल फेरबदल होतील असं देखील यावेळी काँग्रेसकडून सांगण्यात आलं.