नवी दिल्ली – हार्दिक पंड्या हा अतिशय उपयुक्त अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने विश्वचषक स्पर्धेत धडाकेबाज फलंदाजी केली आहे. आता त्याने गोलंदाजीतही चमक दाखविली पाहिजे असे ज्येष्ठ क्रिकेटपटू व समीक्षक कपिलदेव यांनी सांगितले. भारताने 1983 मध्ये पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरले त्यावेळी भारताच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना कपिलदेव यांनी सिंहाचा वाटा उचलला होता.
पंड्या याच्या कामगिरीबाबत कौतुक करीत कपिलदेव म्हणाले की, तो अतिशय हुशार खेळाडू आहे. त्याने बॅटीच्या जोरावर खूप नावलौकिक मिळविला आहे. त्याच्याकडे विकेट्स घेण्याचीही क्षमता आहे. त्याने दिशा व टप्पा ओळखून मारा केला पाहिजे. वेगापेक्षाही त्याने प्रतिस्पर्धी फलंदाजाचे तंत्र पाहून त्यानुसार गोलंदाजी केली पाहिजे.
धवनच्या दुखापतीबाबत कपिलदेव म्हणाले की, त्याला चांगला सूर सापडला आणि संघास त्याची अत्यंत जरूरी असतानाच त्याला गंभीर दुखापत व्हावी ही अत्यंत दुर्दौवाची गोष्ट नाही. अर्थात त्याची उणीव अन्य सहकारी भरून काढतील असा मला विश्वास आहे.