नवी दिल्ली – पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी रविवारी भारत हल्ला करण्याची योजना आखत असल्याचा दावा केला होता. भारत १६ ते २० एप्रिल दरम्यान हल्ला करण्याच्या तयारीत आहे, अशी गुप्त माहिती असल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर आज भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचा हा दावा फेटाळून लावला आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या या दाव्याला पूर्णपणे नकार दिला असून, भारत हा सीमापार असलेल्या दहशतवादावर कारवाई करण्यासाठी आपला अधिकार राखून ठेवत असल्याचे देखील परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. तसेच पाकिस्तानचे हे वक्तव्य बेजबाबदार असून सीमापार असलेल्या दहशतवाद्यांना खत पाणी घालत असल्याचे परराष्ट्र खात्याने म्हंटले आहे.
MEA in response to queries on statement by Pakistan Foreign Min:
India rejects irresponsible statement by Pak Foreign Min with objective of whipping up war hysteria in the region. This public gimmick appears to be a call to Pak-based terrorists to undertake terror attack in India— ANI (@ANI) April 7, 2019
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तन मध्ये घुसून हवाई हल्ला केला होता. त्यानंतर दोन्ही देशातील संबंध तणावपूर्ण झाले होते.