नवी दिल्ली – भारतीय सीमा रेषावर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून आंतरराष्ट्रीय सीमेच्या पलीकडून सातत्याने शस्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये पाकिस्तानने तब्बल 1248 वेळा उल्लंघन केले आहे, अशी माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.
राज्यसभेत भाजपचे खासदार विजय पालसिंग तोमर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. राजनाथ सिंह म्हणाले, पाकिस्तानकडून सीमा रेषावर सातत्याने आगळीक केली जात आहे. सीमा रेषावर होणा-या या आगळीक आणि शस्रसंधी रोखण्यासाठी भारतीय सेन्याकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. या शस्रसंधीबाबत पाकिस्तानला वारंवार कळविण्यात येत असून दोन्ही लष्करी अधिका-यांमध्ये होणा-या बैठकितही यावर चर्चा होत असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मार्च महिन्यात 267 वेळा शस्रसंधी करण्यात आली. या शस्रसंधीत 3 भारतीय जवान शहिद झाले आहेत. या वर्षाच्या प्रारंभी जानेवारीत 203 वेळा, फेब्रुवारीत 215, तर एप्रिल, मे आणि जुनमध्ये अनुक्रमे 234, 221 आणि 108 वेळा सीमा रेषावर पाककडून शस्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.