लंडन – विश्वचषक स्पर्धेतील क्रिकेट सामन्यात भारताने जेव्हा पाकिस्तानचा पराभव केला तेव्हा मला आत्महत्या करावीशी वाटली होती. असा खुलासा पाकिस्तान क्रिकेट टीमचे कोच मिकी आर्थर यांनी केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधला सामना हा युद्धासारखा असतो. हा सामना भारताने जिंकला, मात्र, आमचा संघ पराभुत झाल्यावर मला जीव द्यावासा वाटत होता असे मिकी आर्थर यांनी म्हटले आहे. या संदर्भातला एक व्हिडिओही समोर आला आहे.
त्या सामन्यात भारताने निर्धारित 50 षटकांत 5 बाद 336 धावा केल्या होत्या. त्यानंतर हे आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाला पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार 40 ओव्हर्समध्ये 302 रन्स करण्याचे आव्हान मिळाले होते. पाकिस्तानच्या टीमला 40 षटकांमध्ये 212 धावांचीच मजल मारता आली.
रविवारी दक्षिण अफ्रिकेसोबत झालेल्या सामन्यात पाकिस्तानी संघाने आफ्रिकेचा पराभव केला. ही बाब माझ्यासाठी समाधानकारक आहे तरीही जेव्हा आम्ही भारतासोबत सामना हरलो तेव्हा मला वाटले होती की आत्महत्या कारवी अशी सल त्यांनी बोलुन दाखवली.