इस्लामाबाद: पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी रविवारी भारत हल्ला करण्याची योजना आखत असल्याचा दावा केला आहे. भारत १६ ते २० एप्रिल दरम्यान हल्ला करण्याच्या तयारीत आहे, अशी गुप्त माहिती असल्याचे ते म्हणाले.
14 फेब्रुवारी रोजी काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात पाकिस्तानच्या जश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. या हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहिद झाले होते. यानंतर भारतीय वायुदलाने २६ फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद च्या प्रशिक्षण शिबिर स्थळ उद्वस्त केले.