जानेवारी महिन्यात पार पडणार साहित्य संमेलन
यंदाचे 93 वे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या उस्मानाबादमध्ये घेतलं जाणार आहे. हे साहित्य संमेलन जानेवारी महिन्यात पार पडणार आहे. आज साहित्य महामंडळाच्या पत्रकार परिषदेत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष ‘कौतिकराव ठाले पाटील’ यांनी ही घोषणा केली.
93 व्या संमेलनासाठी बुलढाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद अशा चार ठिकाणाहून संमेलनाची मागणी झाली होती. मात्र त्यामध्ये उस्मानाबादचा नंबर लागला आणि हे साहित्य संमेलन घेण्याचा मान उस्मानाबादला मिळाला. गेल्या आठ वर्षांपासून मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेतर्फे मराठवाड्यात साहित्य संमेलन घेतलं जावं अशी मागणी होत होती.