महाबळेश्वर येथील कार्यकर्ता मेळाव्यात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची सडकून टीका
महाबळेश्वर – बारामती हा मतदार संघ सुरक्षित आहे म्हणून तिथे सुप्रिया सुळे आणि मावळमध्ये निवडून येण्याची खात्री नसल्याने तिथे अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी दिली असा आरोप करून जर तुम्हाला पार्थ निवडून यावा अशी इच्छा होती तर बारामतीमधून पार्थला उमेदवारी का दिली नाही असा सवाल करून शरद पवार यांच्या पक्षात केवळ पवारांची घराणेशाही सुरू असल्याची सडकून टिका महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाबळेश्वर येथे भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केली.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने महाबळेश्वर येथील पालिका सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ना. चंद्रकांत पाटील हे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा सरचिटणिस रविंद्र कुंभारदरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी शरद पवार यांच्याबरोबरच पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही टिका केली.
कराड येथील चव्हाण यांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ देत ना. पाटील म्हणाले, यांना आपल्या दिग्गजांचा भाजपात प्रवेश महाबळेश्वर नगरपालिकेतील लोकमित्र जनसेवा आघाडीच्या नगरसेविका शारदा ढाणक, विमलताई ओंबळे व अपक्ष नगरेसविका आफरिन वारूणकर यांनी आज भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. तसेच अर्बन बॅंकेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक दिलीप रिंगे, राष्ट्ीय कॉंग्रेसचे किसन भिलारे यांच्यासोबत भिलार, भोसे, आंब्रळ येथील अनेकांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. ना. चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन भाजपामध्ये स्वागत केले. पक्षातील माणसे टिकविता येत नाही आणि ते भाजपावर आरोप करतात यालाच नाचता येत नाही अन् अंगण वाकडं अशी कॉंग्रेसच्या नेत्यांची अवस्था झाली आहे. निवडून येता येत नाही म्हणुन ईव्हीएम मशिनवर खापर फोडायचे. आम्ही जर ईव्हीएम घोटाळा केला असता तर आम्ही बारामतीमध्ये ही निवडून आलो असतो परंतु ते शक्य नाही. कारण ईव्हीएम मशिन मॅनेज करता येत नाही हे वारंवार सिध्द झाले आहे.
तरीसुध्दा करायचे म्हणून आरोप करत सुटायचे हे काही बरोबर नाही. तुम्हाला साध्या वाटणाऱ्या बाबी तुम्ही सत्ता असताना केल्या नाहीत त्या आम्ही केल्या. लोकांना घरोघरी गॅस दिले, स्वच्छतागृह दिले, वीज दिली, रस्त्यांचे जाळे वाढविले. तुम्हाला हे करता आले नाही त्याला आमचा काय दोष? अनुदान आता थेट तुमच्या बॅंक खात्यात जमा होते हे तुम्हाला करता आले नाही ते आम्ही केले हे करताना तुम्हाला कोणी अडविले होते असा सवालही पाटील यांनी केला. महाबळेश्वरचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपा कटिबध्द असल्याची ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी आपल्या भाषणात दिली.
विक्रम पावसकर व नगरसेवक कुमार शिंदे यांची यावेळी भाषणे झाली. यावेळी भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष अविनाश फरांदे, उपाध्यक्ष महाबळेश्वर महिला आघाडीच्या उषा ओंबळे, महाबळेश्वर ट्रेकर्सचे अनिल केळगने, भाजपचे ओंकार दीक्षित, सनित उगले, चिन्मय आगरकर, धीरज परमार, अविनाश जाधव, विजय बिरामणे, अविनाश जाधव, राजेंद्र साळवी, किसन उतेकर, मनोहर मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.