नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीआधी देशभरात राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. निवडणुकीच्या तीन दिवस आधी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून संकल्पपत्र असे नाव देण्यात आले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी भरघोस घोषणा करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, काँग्रेसने भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका केली आहे. भाजप आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील फरक पहिल्या पानावर दिसून येतो. काँग्रसकडे लोकांची गर्दी आहे तर भाजपच्या जाहीरनाम्यात फक्त एकच माणूस आहे. भाजपने जाहीरनामाऐवजी ‘माफिनमा’ सादर केल्याचे काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी म्हटले आहे.
घोषणा पत्र की तस्वीर बताती है कि हमारे लिए देश के लोग महत्वपूर्ण हैं और उनके लिए अपना चेहरा। हमारे घोषणा पत्र में देश के करोड़ों लोगों के विचारों का समावेश है, जबकि भाजपा के घोषणा पत्र में सिर्फ एक व्यक्ति के "मन की बात"। अब देश अपने "मन का फैसला" सुनाएगा।#BJPJumlaManifesto pic.twitter.com/TYEUOZ3YZC
— Congress (@INCIndia) April 8, 2019
Ahmed Patel.Congress: The difference between BJP manifesto and Congress manifesto can be seen firstly from the cover page. Our's has a crowd of people, and BJP manifesto has face of just one man. Instead of a manifesto BJP should have come out with a 'maafinama' pic.twitter.com/nGjdHyu3QH
— ANI (@ANI) April 8, 2019