मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काही आमदार वंचित बहुजन आघाडीत जाणार असल्याची चर्चा रंगत आहे. पण या चर्चा तथ्यहीन असून भाजपाप्रमाणेच संभ्रम निर्माण करण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीच नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यात कोणतेही तथ्य नाही, असे मलिक म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे १० आमदार आणि संपूर्ण काँग्रेस पक्ष आपल्या संपर्कात असल्याचे आंबेडकर म्हणाले होते. त्याला नवाब मलिक यांनी उत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादीचे दहा आमदार आणि संपूर्ण काँग्रेस पक्ष माझ्या संपर्कात- प्रकाश आंबेडकर