लंडन – रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंग धोनी यांनी केलेल्या धमाकेदार फलंदाजीच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 5 बाद 352 धावांची मजल मारुन ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 353 धावांचे आव्हान ठेवले.
साल 2013 पासून आयसीसीने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी 20 डावांमध्ये सर्वाधिक 10 वेळा अर्धशतके झळकावत नवा विक्रम रचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहितने अर्धशतक तर धवनने शतक झळकावत हा अनोखा विक्रम केला.