लंडन – इंग्लंडविरूद्ध भारतास विजय मिळावा यासाठी केवळ भारतीय चाहते नव्हे तर आम्ही तसेच श्रीलंका व बांगलादेश या भारतीय उपखेडातील देशांनीही प्रार्थना केली होती. मात्र, आमच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत असे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर यांनी सांगितले.
अख्तर पुढे म्हणाले, फाळणीनंतर प्रथमच आमच्या देशातील क्रिकेट चाहत्यांनी भारतासाठी दुवा मागितल्या होत्या. भारतीय फलंदाजांनी विजय मिळबिण्यासाठी चांगले प्रयत्न केले यात मला कोणतीही शंका वाटत नाही. हा सामना इंग्लंडने जिंकल्यामुळे आमच्या बाद फेरीच्या आशा अधांतरित झाल्या आहेत.