मुंबई – सध्या पाश्चिमात्य पद्धतीच्या पेयांचा बोलबाला आहे. आम्ही भारतातील फळांचा वापर करून विकसित केलेली कॉकटेल सादर करणार आहोत असे रसना या कंपनीचे अध्यक्ष पिरूझ खंबाटा यांनी सांगितले.
ते म्हणाले की आम्ही 5 वर्षांत 500 स्टोअर उभारणार आहोत. यातून 500 कोटी रुपयांची उलाढाल होईल याची आम्हाला खात्री आहे. आमची पेये निरोगी, सोयीस्कर असतील यात कॉफी, अल्कोहोल असणार नाही.