रांची – राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी झारखंड उच्च न्यायालयाने शुक्रवारी लांबणीवर टाकली. त्यामुळे आणखी काही दिवस तरी लालू तुरूंगाबाहेर पडू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले.
चारा घोटाळ्याशी संबंधित चार प्रकरणांत दोषी ठरल्याने लालू तुरूंगवास भोगत आहेत. चारपैकी तीन प्रकरणांत लालूंना याआधीच जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे चौथ्या प्रकरणात जामीन मिळाला असता तर लालू तुरूंगाबाहेर येऊ शकले असते. मात्र, लेखी उत्तर देण्यास सीबीआयने अधिक अवधी मागितल्याने न्यायालयाने लालूंच्या जामीन अर्जावरील सुनावणी 27 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली.
पाच वर्षानंतर उलगडलं हत्येचं ‘गुपित’; भिंतीत लपवला होता मृतदेह
त्यामुळे लालू तुरूंगाबाहेर येण्याची आशा असणाऱ्या त्यांच्या कुटूंबीयांचा आणि राजद समर्थकांचा भ्रमनिरास झाला. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. त्याआधी लालू तुरूंगाबाहेर येतील आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सत्तेबाहेर जातील, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी लालूपुत्र तेजस्वी यादव यांनी केले होते.
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! या तारखेपासून शाळा सुरू होणार
आता सुनावणी लांबणीवर पडल्याने लालूंची इतक्यात जामीनावर सुटका होऊ शकणार नाही. ते डिसेंबर 2018 पासून रांचीमधील तुरूंगात आहेत. प्रकृती बिघडल्याने काही दिवसांपासून त्यांना उपचारासाठी रांचीमधील रूग्णालयात ठेवण्यात आले आहे.