कोलकाता – पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही, असा दावा भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे. जय श्रीराम प्रकरणावरून भाजपाने ममतांना टार्गेट केले आहे. त्यासाठी भाजपाने ममतांना जय श्रीरामही घोषणा लिहिलेली 10 लाख पोस्टकार्ड पाठवण्याची तयारी केली आहे. तर दुसरीकडे तृणमूल कॉंग्रेसने जय हिंद-जय बांगला अशी घोषणा लिहिलेली 20 लाख पोस्टकार्ड मोदी आणि शाह यांना पाठवणार असल्याचे म्हटले आहे.
विजयवर्गीय म्हणाले, ममता बॅनर्जींचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही. कारण त्यांच्या पक्षांतर्गत आणि नेत्यांमध्ये मोठा असंतोष असून ते कधीही पक्ष सोडू शकतात. इतकेच नव्हे तर पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांना या गोष्टीची भीती आहे की, ममतांचा भाचा अभिषेक आगामी काळात त्यांचा राजकीय वारसदार असेल. त्युाळे त्या पक्षात अस्वस्थता पसरली आहे.