नवी दिल्ली – भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी स्वत: गेल्या नऊ वर्षांत खासदार म्हणून मिळणारा पगार हा गरीब आणि गरजू लोकांना वाटला आहे. वरुण गांधी हे सुल्तानपूर मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. संसदेत जेव्हा जेव्हा खासदारांचा पगार वाढण्यात आला तेव्हा त्यांनी आपला विरोध नोंदवला आहे.
या वर्षाच्या सुरुवातीलाच लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे त्यांनी मागणी केली होती की आर्थिकदृष्ट्या सबल खासदारांनी पगार सोडावा.
लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात वरुण गांधी लिहितात की, आर्थिक असमानता दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील एक टक्का श्रीमंत लोकांकडे देशाच्या एकूण संपत्ती पैकी 60 टक्के मालकी आहे. देशातील 84 अब्जोपतींकडे देशातील 70 टक्के संपत्ती आहे. हे आपल्या लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. म्हणून आपल्या मतदारसंघात त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिली आहे.