पुणे – विधानसभा निवडणुकीत नेताजी कॉंग्रेस सेना पक्ष समविचारी पक्षांशी युती करणार, असे पक्षाचे संस्थापकीय अध्यक्ष रंगा शेठ यांनी सांगितले.
आगामी विधानसभेच्या निवडणुकीत नेताजी कॉंग्रेस सेना समविचारी पक्षांशी युती करणार आहे. समजा समविचारी पक्षांशी युती न झाल्यास पुण्यासह राज्यातील 21 मतदारसंघांत नेताजी कॉंग्रेस सेना आपले उमेदवार उभे करेल. इतर पक्षांतील विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांना तिकीट न मिळाल्यास त्यांनी एन.सी.एस.मध्ये प्रवेश करावा आपण त्यांना तिकीट देऊ, असे रंगा शेठ यांनी सांगितले.
काही राजकीय मंडळी जातीवादी विष पेरत आहेत. त्यामुळे देशात दुफळी माजली आहे. ही दुफळी दूर करण्यास एस.सी.एस.पक्ष कटिबद्ध आहे. तसेच विधानसभा निवडणूक एन.सी.एस.पक्ष सर्वधर्म समभावासाठी निवडणूक लढणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकशाहीमध्ये निवडणूक एक जादू बनली आहे. निवडणुकीच्या आधी लोकांची दिशाभूल सत्ताधारी पक्षांकडून सुरू असते. सरकार हे आपल्या माणसांसाठी काम करत आहे, असे संदीप पाटील यांनी सांगितले.