मुंबई – साध्वी प्रज्ञासिंह यांनी मुंबई हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर समाज माध्यमातून चौफेर टीकेची झोड उठली आहे.
राजकीय विधानांचा निचांक गाठणारं वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी केलं असल्याची टीका राष्ट्रवादीचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.भाजपने याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही आव्हाडांनी केली आहे.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/2004494509680142/?__xts__[0]=33.%7B%22logging_data%22%3A%7B%22page_id%22%3A217046208635092%2C%22event_type%22%3A%22clicked_all_page_posts%22%2C%22impression_info%22%3A%22eyJmIjp7InBhZ2VfaWQiOiIyMTcwNDYyMDg2MzUwOTIiLCJpdGVtX2NvdW50IjoiMCJ9fQ%22%2C%22surface%22%3A%22www_pages_home%22%2C%22interacted_story_type%22%3A%22565413710334575%22%2C%22session_id%22%3A%2291338731d9d7d9c07487b3fa0ba8e5d0%22%7D%7D
प्रज्ञासिंग ठाकूर च्या विधानाचा जाहीर निषेध आव्हाडांनी केला आहे. तिच्या मतानुसार करकरे साहेब कर्माने गेले तर मग 26/11 वेळी आलेले दहशतवादी काय देवदूत होते का ? याबद्दल पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचं काय मत आहे…? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.