मुंबई – निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाला झुकते माप देत आहे. एवढेच नव्हे तर भाजप पक्षाला निवडणुका सोयीस्कर जाव्या असे वेळापत्रकच निवडणूक आयोगाने देत ते निष्पक्ष नसल्याचे दाखवून दिले आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते व प्रवक्ते नवाब मलिक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना निवडणुक आयोगावर केली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, निवडणुक आयोग, रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया, सीबीआय अशा स्वायत्त संस्था सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात स्वतंत्र नाहीत.
नरेंद्र मोदी यांनी स्वायत्त संस्थाना गुलाम करून टाकलं आहे. त्यामुळे सर्वच अधिकार हे स्विकारतील असं नाही, त्यामुळेच लवासा यांनी नाराज होऊन समोर येत पत्र लिहिले. त्यांच्यासारखचं अलोक वर्मा यांच्या बाबतीत झालं. आरबीयचे गर्व्हनर यांनी राजीनामा दिला तर सुप्रिम कोर्टचे न्यायाधिश यांनी पत्रकार परिषद घेतली, असे दाखले यावेळी नवाब मलिक यांनी दिले.