नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. कॉंग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर राहुल गांधी हे अजूनही ठाम आहेत. तर २०१९ लोकसभा निवडणुकीच्या अपयशाचा फटका सर्वच राजकीय नेत्यांना बसल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘आयुष्य स्वतःच्या हिंमतीवर जगायचे असते…’ असे भावुक ट्विट करत नवजोत सिंह सिद्धू यांनी कार्यकर्त्यांना न खचण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे सिद्धू यांच्यावर सोशल मध्य,माध्यमांमध्ये टीका होत आहे. मात्र अशा परिस्थितीत देखील सिद्धू यांनी ट्विट करत हिंमतीने अपयशाला पुढे जात असल्याचे सांगितले आहे की, ‘ज़िन्दगी अपने दम पर जी जाती है,औरो के कंधों पर तो जनाजा उठा करता है|’
ज़िन्दगी अपने दम पर जी जाती है,
औरो के कंधों पर तो जनाजा उठा करता है|— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) May 28, 2019