खामगाव: बुलडाणा मतदारसंघातील सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खामगाव येथील सभेत केले. मागील पाच वर्षांत पंतप्रधान मोदींनी काय केले हे आपल्याला कळले आहे. मोदी देशाचा जपान करतील अशी अपेक्षा असताना त्यांनी देशाचा नेपाळ करुन ठेवला असल्याचे पाटील म्हणाले.
जयंत पाटील म्हणाले, देशाचे चौकीदार म्हणून मोदी पंतप्रधान पदाला पोहचले मात्र त्यांच्या काळात अनेक लोक घोटाळे करुन पळून गेले. देशात तब्बल ३६ जणांची यादी ईडीने समोर आणली आहे. कुठे गेला चौकीदार आता? खामगाव सोबत देशाच्या सर्व व्यापाऱ्याला याचा फटका लागला. याचा परिणाम देशाच्या हाती बेरोजगारी आली. मोदींनी भारताच्या तरुणांच्या हातचे काम काढून घेण्याचे काम केले असल्याचे पाटील म्हणाले.