नवी दिल्ली – माझ्या कडुन आणि कुलदीप यादवकडुन सध्या जी काही चांगली कामगिरी होत आहे त्यामागे भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीचे मोलाचे योगदान आहे. अशी प्रतिक्रिया भारताचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलने दिली आहे. एका वेबसाईटशी बोलताना चहलने आपले मत व्यक्त केले आहे.
सुरवातीला मी आणि कुलल्दीप आम्ही दोघेही इतर फिरकी गोलंदाजांप्रमाणेच केवळ धावा वाचवण्यासाठी गोलंदाजी करायचो परंतु धोनीमुळे आमचा आत्मविश्वास उंचावला. आमची विकेट्स घेण्याची भूक वाढली. आम्ही प्रत्येक चेंडू विकेट्स मिळवण्याच्याच उद्देशाने टाकू लागलो. असे मत युझवेंद्र चहलने वक्त केले. या दोघांनी मिळून गेल्या चार वर्षांत 159 विकेट्स घेतल्या आहेत. या जोडीने केलेल्या अफलातुन कामगीरीच्या जोरावरच भारताने दक्षिण आफ्रीका व ऑस्ट्रेलीया सारख्या मातब्बर संघांना त्यांच्याच घरात एकदिवसीय मालिकेत हरवले होते.
चहलने या मुलाखतीत आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय धोनीला दिले. आपण अनिल कुंबळे, शेन वॉर्न, मुथैया मुरलीधरन, ग्रॅम स्वान यांसारख्या अनेक महान गोलंदाजांना सांघिक कामगिरीने बळी घेताना पाहिले आहे. धोनीने मला व कुलदीप यादवला जोडी बनून गोलंदाजी करण्यास प्रोत्साहीत केले परिणामी आम्ही एकमेकांना अनुकूल अशी गोलंदाजी करू लागलो. यामुळे आम्हाला पहिल्यापेक्षा अधिक विकेट्स मिळू लागल्या. धोनी व्यक्तिरीक्त विराट कोहली, रोहित शर्मा व रविंद्र जडेच्या यांच्याही अनुभवाचा आम्हाला वेळो वेळी फायदा होतो. असेही मत चहलने यावेळी व्यक्त केले.
दक्षिण आफ्रीका व इंग्लंड या दोन देशांविरोधात कसोटी मालिकेत मिळालेले पराभव सोडले तर गेल्या दोन वर्षांत भारतीय संघाने जवळपास प्रत्येक संघाला त्यांच्याच घरात जाऊन पराभूत केले आहे. भारतीय संघाने केलेल्या या जबरदस्त प्रदर्शनामागे युझवेंद्र चहल व कुलदीप यादव या दोन फिरकी गोलंदाजांचा सिंहाचा वाटा आहे.