कोल्हापुरात 6 दुचाकी जाळल्याने खळबळ
कोल्हापूर, (प्रतिनिधी) – गाड्या जाळण्याचे मुंबई-पुण्याचं लोण आता कोल्हापूर पर्यंत येऊन पोहोचल आहे. कोल्हापुरात एका रात्रीत 6 दुचाकी गाड्या जाळण्याच्या प्रकार घडल्याने एकाच खळबळ उडाली आहे. शाहूपुरी पोलीस घटनास्थळी पोहचले असून गाड्या जळणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.
कोल्हापूर शहरात रमणमळा नावाच्या परिसरात अनेक कुटुंब राहायला आहेत. नेहमी प्रमाणे सोनवणे कुटुंबीय आपल्या दुचाकी घरासमोरील रस्त्यावर पार्किंग केल्या होत्या. मध्यरात्री 3 ते 4 वाजण्याच्या सुमारस अज्ञात व्यक्तींनी रमणमळा परिसरात रस्त्यावर लावलेल्या 6 दुचाकी पेटवून दिल्या. यामध्ये 6 दुचाकी पूर्ण जळाल्या आहेत. तर सुमारे 2 लाखांचे नुकसान झाले असल्याचे प्राथमिक अंदाज आहेत.
या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना कळाल्यावर शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली असून गाड्या जाळणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. अज्ञातांच्या या कृत्याने परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.