चेन्नई – पहिल्या एलिमीनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने चेन्नई सुपर किंग्जचा सहा गडी राखून पराभव करताना अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यात चेन्नईच्या संघाने नानेफेक जिंकूण प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला नेमकी हिच चुक चेन्नईच्या पराभवाला कारण ठरल्याचे मान्य करत धोनीने हे आमचे घरचे मैदान आहे. येथील खेळपट्टीचा अंदाज आम्हाला असायला हवा. मात्र, आमचा अंदाज चुकला असे म्हणत धोनीने आपली चुक मान्य केली.
यावेळी नानेफेक जिंकुण प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला निर्धारित 20 षटकांत 5 बाद 132 धावांचीच मजल मारता आली होती. यावेळी सुरूवाती पासूनच मुंबईच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजांवर दडपण आणले होते. हे दडपण सामन्याच्या वेळी स्पष्ट जानवत होते. त्यामध्येच खराब चेंडूंवर चुकिचे शॉट मारत चेन्नईच्या सलामीवीरांनी आपल्या विकेट फेकल्याने त्यांचा संघ आणखीनच दडपणात आला होता.
या बद्दल बोलताना चेन्नईचा कर्णधार धोनी म्हणाला की, चेन्नईमध्ये आम्ही यंदाच्या मोसमातील सात सामने खेळलेलो होतो. घरचे मैदान असल्याचा आम्हाला तो फायदा होता. यावेळी आम्हाला सामन्यापुर्वीच मैदान आणि खेळपट्टीचा अंदाज यायला हवा होता. खेळपट्टीवरील चेंडू किती वळतोय, चेंडू बॅटवर येतोय की नाही याचा अंदाज मुंबईच्या संघा पेक्षा आम्हाला आधी यायला हवा होता. मात्र, आम्ही नेमका अंदाज घ्यायला चुकलोत त्याचा परिणाम आम्हाला सामन्यात जाणवला.
यावेळी धोनीने आपल्या फलंदाजांवर टिका करताना सांगितले की, आमच्या फलंदाजांनी मागिल काही सामन्यांमध्ये अतिषय खराब प्रदर्शन केले असून त्यांनी आपल्या विकेट चुकिचे फटके मारत अक्षरशः फेकल्या आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम मधल्या फळीतील फलंदाजांच्या कामगिरीवर झाला असून हेच आमच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले आहे असेही त्याने यावेळी नमूद केले आहे.
तसेच गोलंदाजांचे समर्थन करताना धोनी म्हणाला की, आमच्या गोलंदाजांना आजच्या सामन्यात छोट्या लक्ष्याचा बचाव करायचा होता. त्यामुळे त्यांना स्ट्म्पस पासून चेंडू थोडा बाहेर फेकावा लागणार होता. कारण, त्यांच्या प्रत्येक षटकातील एखादा चौकार आणि षटकार आमच्या छोट्या लक्षाचा यशस्वी पाठलाग करण्यास मुंबईच्या फलंदाजांना मदतगार ठरला असता.