देहुरोड – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मतांच्या अधिकारामुळे मावळ लोकसभा मतदार संघातील मतदारांनी देशाची सुरक्षा व विकास कामांना प्राधान्य देत मला निवडून दिले आहे. मी विकास कामांना प्राधान्य देईल, असे ग्वाही देत खासदार श्रीरंग बारणे यांनी देहूरोड येथे मतदारांचे आभार मानले.
सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले खासदार श्रीरंग बारणे यांचा नागरी सत्कार आणि “लाडू तुला’ समारंभ देहुरोड येथे महायुतीच्या वतीने मंगळवारी (28) आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी खासदार बारणे बोलत होते. व्यासपीठावर आल्यानंतर त्यांची लाडू तुला करण्यात आली. सुमारे 82 किलो वजनाचे लाडू यावेळी वाटप करण्यात आले. या वेळी कॅंटोन्मेंट बोर्डाचे सदस्य विशाल खंडेलवाल आदी उपस्थित होते.