“वायू’ वादळाचा वेग मंदावल्याने वाटचाल सुरू
पुणे – अरबी समुद्रातील “वायू’ चक्रीवादळामुळे थांबलेला मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरू झाला आहे. शुक्रवारी मान्सून दक्षिण कर्नाटकाच्या भागात पोहचला.
सध्या मान्सूनची वाटचाल खूपच अडखळत सुरू आहे. आगमनास प्रतिकूल स्थिती असल्याने यंदा केरळात नियमित वेळेच्या तब्बल आठवडाभर उशिराने मान्सून केरळात दाखल झाला. दोन दिवसांत किनाऱ्यावर आणखी प्रगती करत कन्नूरपर्यंत टप्पा पूर्ण केला. त्यानंतर दि.10 जूनच्या आसपास केरळचा बहुतांशी भाग मान्सूनने व्यापला. दरम्यान, राज्यात मान्सून साधारणत: 13 जूनपर्यंत पोहोचण्याची शक्यता होती, पण त्याचदरम्यान अरबी समुद्रात “वायू’ वादळाची निर्मिती झाली. यामुळे मान्सूनची वाटचाल प्रभावित झाली.