मध्य प्रदेश: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली आहे. खराब हवामानामुळे जर विमानं रडारवर दिसत नाहीत तर मग पाऊस पडल्यावर ही विमानं गायब होतात का?, असा मिश्किल प्रश्न त्यांनी मोदींना विचारला आहे. मध्यप्रदेशात एका रॅलीत ते बोलत होते.
नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये “एअर स्ट्राईकच्या आधी ढगाळ वातावरण असल्याने हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात तज्ज्ञ होते. मात्र भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो असा सल्ला मी दिला”, असे म्हटले होते. त्यानंतर विरोधकांनी मोदींवर चांगलीच टीका केली.
राहुल गांधींनी बेरोजगारी वरून सुद्धा मोदींना लक्ष केले. तुम्ही जनतेला आंबे कसे खाता ते सांगितले , कुर्ता कसा घालायचा हे शिकवण्याचा प्रयत्न केला मात्र बेरोजगारीचं काय? वर्षाला २ कोटी रोजगारांचं आश्वासन दिलं होतं त्याचं नेमकं काय झालं? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.