नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. एक देश आणि एक निवडणूक, या विषयावर चर्चा करण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रमुखांना दिल्लीत बोलाविले होते. मात्र या बैठकीला ममता बॅनर्जी यांच्यासह बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी उपस्थित राहिल्या नाहीत.
त्या म्हणाल्या, मोदींनी या विषयावर चर्चा करण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन या विषयावर बैठक आयोजित केली असती तर मी या बैठकीला गेले असते. एक देश एक निवडणूक हा केवळ लोकांचे देशातील वाढत्या दारिद्य्रावरील लक्ष विचलीत करण्याचा प्रकार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
त्या पुढे म्हणाल्या, एकाच वेळी देशभरात सर्वच पातळ्यांवरील निवडणुका घेणे हा काही लोकशाही पुरक पर्याय होऊ शकत नाही. विरोधकांनी सातत्याने मागणी करूनही बॅलट पेपर ऐवजी इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनवरच चिकटून राहणे हाच लोकशाहीला मोठा धोका आहे असे त्यांनी म्हटले आहे.
बैलेट पेपर के बजाए ईवीएम के माध्यम से चुनाव की सरकारी जिद से देश के लोकतंत्र व संविधान को असली खतरे का सामना है। ईवीएम के प्रति जनता का विश्वास चिन्ताजनक स्तर तक घट गया है। ऐसे में इस घातक समस्या पर विचार करने हेतु अगर आज की बैठक बुलाई गई होती तो मैं अवश्य ही उसमें शामिल होती।
— Mayawati (@Mayawati) June 19, 2019