मुंबई: हेमंत करकरे यांनी दहशतवाद्यांकडून आपल्या नागरिकांचे रक्षण करताना प्राण गमावला. महाराष्ट्र हि अशाच शुरांची भूमी आहे. या साध्वीचे समर्थन करून नरेंद्र मोदी यांनी करकरे यांच्या हौतात्म्याचा आणि महाराष्ट्राचाही अपमान केला आहे. मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
शहीद हेमंत करकरेंबद्दल केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे वादात अडकलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची भाजपकडून पाठराखण करण्यात आली आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविरोधात हिंदू दहशतवादाच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते, असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हंटले आहे. ते कोलकाता येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
अमित शहा म्हणाले कि, साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविरोधात हिंदू दहशतवादाच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. याद्वारे जगात देशाच्या संस्कृतीला बदनाम करण्यात आले. कोर्टात त्यांचा खटला खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. ते पुढे म्हणाले, स्वामी असीमानंद आणि इतर लोकांनाही खोटे खटले दाखल करुन आरोपी बनवण्यात आले. समझौता एक्स्प्रेसमध्ये स्फोट करणारे लोक कुठे आहेत. ज्या लोकांना पकडण्यात आले होते त्यांना का सोडण्यात आले, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
हेमंत करकरे यांनी दहशतवाद्यांकडून आपल्या नागरिकांचे रक्षण करताना प्राण गमावला. महाराष्ट्र हि अशाच शुरांची भूमी आहे. या साध्वीचे समर्थन करून नरेंद्र मोदी यांनी करकरे यांच्या हौतात्म्याचा आणि महाराष्ट्राचाही अपमान केला आहे. मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 22, 2019