नांदेड – पुलवामातील शहीद जवानांच्या नावे मतं मागतायेत, ते काय निवडणुकीला उभे आहेत का? अभिनंदन निवडणुकीला उभा आहे का? योगी आदित्यनाथ म्हणाले देशाची सेना ही म्हणे मोदींची सेना आहे. मोदींनी नव-मतदारांना आवाहन केलं की तुमचं पहिलं मत हे बालाकोटचा एअरस्ट्राईक करणाऱ्या सैन्यासाठी, पुलवामाच्या वीर शहिदांसाठी द्या. जवानांच्या नावावर मतं मागताना लाज नाही वाटत?, असं म्हणत राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्यावरुन नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/864906670540362/
लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नांदेडमध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर घणाघात केला. तर त्यांच्या भाषणातून आणि वेगवेगळे पुरावे सादर करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समाचार घेतला. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणतात की महाराष्ट्रात एक लाख वीस हजार विहिरी खणल्या.. कुठे आहेत ह्या विहिरी? महाराष्ट्र गोदावरीच्या पाण्यासाठी भांडतोय आणि दुसऱ्या मार्गाने गुजरातला वळवत आहेत. आणि ह्यावर देवेंद्र फडणवीस काहीच बोलत नाही कारण हा तर बसवेलला मुख्यमंत्री.
यावेळी सभेत राज ठाकरे यांनी बेरोजगारी, बालकोट एअरस्ट्राईक, नोटबंदी ,जीएसटी, महाराष्ट्रातील गोदावरी पाणीप्रश्न, बीडमधील गर्भाशयं प्रकरण यावरून पंतप्रधान मोदींसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.