मुंबई: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मोदी वर्तणुकीबाबत टीका केली आहे. निवडणुकांमधील पराभवाच्या भीतीने मोदींकडून अणुबॉम्बचा मुद्दा उपस्थित करण्यात येत असून मेहबुबा मुफ्ती आणि मोदींची मिलिभगत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार आरोपांची खडाजंगी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान मधील बाडमेर येथील जाहीर सभेत पाकिस्तनाला चांगलाच दम दिला होता. आमच्याकडील अण्वस्त्रे आम्ही दिवाळीसाठी ठेवलेली नाहीत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी, पाकिस्तानकडील अण्वस्त्रे ही ईद साठी नक्कीच ठेवलेली नसतील, असे म्हंटले होते.
यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष @Jayant_R_Patil यांचा मोदी वर्तणुकीबाबत ठोकताळा
"निवडणुकांमधील पराभवाच्या भीतीने मोदींकडून अणुबॉम्बचा मुद्दा"
"मेहबुबा मुफ्ती आणि मोदींची मिलिभगत"@narendramodi @PMOIndia @BJP4India @BJP4Maharashtra #NCP2019 #LoksabhaElections2019 pic.twitter.com/NhjzLmZ1KW
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 23, 2019