कोलकाता: तेलगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबु नायडू आणि तृणमुल कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी निवडणुक निकालानंतरच्या संभाव्य स्थितीविषयी चर्चा केली. विरोधकांची महाआघाडी भक्कम करण्याच्या अनुषंगानेही त्यांनी आपसात काही विषयांवर चर्चा केली असे सांगण्यात येते. गुरूवारी रात्री त्यांच्यात ही बैठक झाली. कोलकात्यात ममतांशी चर्चा करण्यापुर्वी बुधवारी चंद्राबाबू यांनी राहुल गांधी यांच्याशीही चर्चा केली होती.+
निवडणुकांचे निकाल लागण्याच्या आधी 21 मे रोजी दिल्लीत विरोधी आघाडीच्या नेत्यांची एक बैठक घेण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठीही चंद्राबाबू पुढाकार घेत आहेत. दरम्यान या दौऱ्याच्यावेळी नायडू यांनी खरगपुर येथे ममतांच्या प्रसारसाठी जाहींर सभाही घेतली. भाजपला सत्तेवरून हटवण्यासाठी ममतांच्या पाठीशी उभे राहा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.