मुंबई – भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकाता येथील रोड शोवेळी मंगळवारी तुफान राडा झाला. यावेळी भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने रोड शो पूर्णत्वास जाऊ शकला नाही. राड्यावेळी दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार घडले. दरम्यान काल झालेल्या या राड्यावेळी पोलिसांनी पक्षपाती भूमिका घेत भाजप कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे. अशातच आज पॉलिसांकडून करण्यात आलेल्या या लाठीचार्जचा मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र निषेध केला आहे.
Maharashtra CM Devendra Fadnavis on clashes in Amit Shah’s roadshow in Kolkata, #WestBengal: Mamata Ji has become so scared of her defeat, that she is killing democracy & doesn’t even want to let anyone campaign. I appeal Election Commission to ensure free & fair polls. pic.twitter.com/kNJpHrdqym
— ANI (@ANI) May 15, 2019
एका वृत्त संस्थेने याबाबत वृत्त दिले असून, मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण हिंसाचाराचा तीव्र निषेध करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, “पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीची सारीच मूल्ये पायदळी तुडवली जात असून, जेव्हा सार्या सीमा संपतात, तेव्हा पतन अटळ असते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आता तेथील जनता नमविल्याशिवाय राहणार नाही.”