कोलकाता – नरेंद्र मोदींनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. भाजप एनआरसी आणि नागरिकत्व विधेयकाच्या नावावर देशाच्या वैध नागरिकांना विदेशी ठरविण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्रातील नव्या सरकारच्या स्थापनेचे नेतृत्व तृणमूल कॉंग्रेस करणार असल्याचा दावा त्या पक्षाच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी अलीद्वारपूर येथील सभेत बोलताना केला आहे.
देशाच्या जनतेला वाचविण्यासाठी भाजपला पराभूत करावे लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील 5 वर्षांपासून खोटे बोलत आहेत. एनआरसी आणि नागरिकत्व विधेयक या देशाच्या नागरिकांना शरणार्थी करण्याची एक खेळी असल्याची टीका ममतांनी केली आहे.