पनीघाट – पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभवाच्या भीतीने ग्रासले आहे. आता आपण पुन्हा सत्तेवर येणार नाही याची त्यांना खात्री पटली असून त्यांचा चेहरा आता त्यामुळेच निस्तेज झाला आहे असे प्रतिपादन तृणमुल क्रॉंगेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केले आहे. आज येथील एका प्रचार सभेत बोलताना त्या म्हणाल्या की उत्तरप्रदेश, दिल्ली, राजस्थान, पंजाब, आंध्रप्रदेश, गुजरात, ओडिशा आणि अन्य राज्यांत ते पराभूत होत आहेत. त्यामुळेच ते आता वाटेल तेच बडबडत सुटले आहेत.
ते त्रिपुरात जिंकतील. त्याची मला चिंता नाही कारण तेथील विजयाने त्यांना 543 मतदार संघातील आव्हान पेलता येणार नाही. त्यामुळे ते आता पश्चिम बंगाल मध्ये येऊन हातपाय पसरण्याचा प्रयत्न करीत आहेत असे त्या म्हणाल्या. पश्चिम बंगालसाठी मी काहीही केले नाही असे मोदी म्हणतात. हे जर खरे असेल तर येथील लोक मला जाब विचारतील तुम्ही कशाला लुडबुड करता असा सवालही त्यांनी केला.